इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांना ९ मे २०२३ रोजीच्या दंगलीशी संबंधित आठ खटल्यांत सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर न्यायालयाने कोणतीही नोटीसही जारी केली नाही. आता या प्रकरणांची पुढील सुनावणी थेट १२ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


या खटल्यांचा संबंध ९ मे २०२३ रोजी देशभरात उसळलेल्या हिंसाचाराशी असून, लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर हल्ल्याचाही त्यात समावेश आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने इम्रान खान यांना या सर्व प्रकरणांमध्ये जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाद मागितली होती, मात्र २४ जून रोजी उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.



गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. या प्रकरणांची सुनावणी मुख्य न्यायाधीश याह्या आफ्रिदी यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठाने केली.


इम्रान खान यांचे मुख्य वकील सलमान सफदर हे देशाबाहेर असल्याने, पीटीआयचे सरचिटणीस सलमान अक्रम राजा यांनी त्यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी खंडपीठाकडे विनंती केली की, संबंधित पक्षांना नोटीस बजावण्यात यावी आणि सुनावणी पुढील आठवड्यात ठेवण्यात यावी. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत सुनावणी १२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.


या निर्णयामुळे तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला असून, त्यांच्यावर असलेल्या कायदेशीर गुंतागुंतीत अधिक वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना