ऑक्टोबरमध्ये होणार परळ टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीला सुरुवात!

मुंबई : मुंबई शहरासाठी महत्त्वाचा असलेल्या व पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांसाठी अंदाजे १३ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदाराची निवडही करण्यात आली आहे. ही दुरुस्ती पावसाळ्यानंतर टप्प्याटप्याने केली जाणार आहे.


परळ टीटी उड्डाण पुलाला यंदा ३६ वर्षे पूर्ण झाली असून, २०२३ मध्ये डांबरी पृष्ठभाग खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पुलाची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. राज्य सरकारने महापालिकेला तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. यानंतर महापालिकेने सप्टेंबर २०२४ मध्ये पुलाच्या संपूर्ण बळकटीकरणासाठी निविदा काढली होती. आता ती अंतिम करण्यात आली असून लवकरच पुलाचे काम सुरू होणार आहे.


दुरुस्तीचे काम करण्यासाठी उड्डाणपूल बंद केल्यास भायखळा, लालबाग, दादर, सायन आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सायन उड्डाणपूलही बंद असल्याने वाहतुकीची जबाबदारी परळ पुलावर आहे. म्हणून हे काम टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. या पुलामध्ये सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करून १० पर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक प्रसरण सांधे हे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असल्याने, काँक्रिटीकरण करून पुलाच्या मजबुतीकरणासह रस्त्याच्या पृष्ठभागालाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता