'पीएमपी'त लवकरच स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. सप्टेंबर २०२५ पासून ताफ्यात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे दीड लाख प्रवाशांची सोय होणार आहे.


टाटा कंपनीकडून खरेदी करण्यात येणाऱ्या या बस लखनऊमधून पुण्यात आणल्या जाणार आहेत. पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच लखनऊमध्ये जाऊन यासंदर्भात पाहणी केली आहे. या बस खरेदी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांनी पीएमपीला आर्थिक मदत केली आहे. प्रत्येक बसची किंमत सुमारे ४६ लाख रुपये आहे. नुकत्याच पीएमपीच्या ताफ्यात ४०० भाडेतत्त्वावरील नवीन सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पैकी ३६० बस आत्तापर्यंत दाखल झाल्या असून, उर्वरित ४० बस चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात येतील. पीएमपीच्या प्रवासात आलेला विस्कळितपणा दूर होण्यास मदत मिळणार आहे.




''प्रवाशांना उत्तम आणि आरामदायी प्रवास सुविधा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या नवीन २०० सीएनजी बसमुळे पीएमपीच्या सेवेत नक्कीच सुधारणा होईल. त्यामुळे केवळ गर्दीच कमी होणार नाही, तर पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या बसमुळे प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल. दोन्ही महानगरपालिकांच्या आर्थिक मदतीमुळे हे शक्य झाले आहे आणि आम्ही लवकरच या बस सेवेत दाखल करण्यासाठी उत्सुक आहोत.''
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल


Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील