आठ लाख झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश

निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्राधिकरणासमोर आव्हान


मुंबई  :  मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पात्रता निश्चिती अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे हे प्राधिकरणासमोर एक मोठे आव्हान आहे. आगामी पाच महिन्यांत तब्बल ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य प्राधिकरणाने ठेवले आहे.


आतापर्यंत मुंबईतील एकूण १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी केवळ ५ लाख ७५ हजार १३६ झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याचा अर्थ अजूनही ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील सर्वेक्षण बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे झोपु प्राधिकरणासमोर पाच महिन्यांत उर्वरित मोठ्या संख्येने झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी झोपु प्राधिकरणाने कंबर कसली आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत जेणेकरून कामाला गती मिळेल.झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीत पारदर्शकता आणण्यासाठी २०१६ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता.


मुंबईतील २५९७ झोपडपट्ट्यांमधील १० लाख ७८ हजार ७४६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये प्रत्यक्ष बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र, एका संस्थेच्या कामामुळे काही अडचणी आल्या होत्या. सध्या ८ लाख २२ हजार ८४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले आहे. झोपडीधारकांचे योग्य सहकार्य मिळवण्यासाठी प्राधिकरणाने जनजागृती मोहिमेवरही भर दिला आहे. पाच महिन्यांत ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करणे हे निश्चितच एक मोठे आव्हान आहे, परंतु प्राधिकरण हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सर्वेक्षणातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळेल आणि पात्र झोपडीधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर