डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार

मुंबई : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीच्या औचित्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्य कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

डॉ. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इत्यादी बाबींतील विशेष कार्य विचारात घेऊन त्याअनुषंगाने शाश्वत शेती दिन राज्य / जिल्हा / तालुका स्तरावर साजरा करणे, विद्यापीठ स्तरावर साजरा करणे, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देणे, इत्यादी बाबींसंदर्भात कृषी आयुक्तलयाच्या वतीने शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

विद्यापीठांतर्गत स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर - संशोधन केंद्र.

प्रत्येक कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान व अन्न सुरक्षा या संदर्भातील एक स्वंतत्र विषय निवडून विद्यापीठांतर्गत "डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर- संशोधन केंद्र" स्थापन करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा