वारजे-कर्वेनगर परिसरात मृत्यूचा सापळा

अनधिकृत फलकांवर कारवाईची मागणी


कर्वेनगर : वारजे-कर्वेनगर परिसरात मुख्य रस्त्यावर वारजे उड्डाणपूल येथे विद्युत रोहित्र, विद्युत खांब, लोखंडी सळ्या, मोठ्या प्रमाणात लाकडी बांबू विखुरले आहेत. त्यामुळे हा परिसर येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. हे साहित्य तत्काळ हटवा अशी मागणी नागरिक करत आहेत.


पावसाळ्यात उघड्या तारांना स्पर्श होऊन एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. वारा, पावसात हे बांबूचे डोंगर कोसळून अपघात घडू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पादचारी, वाहनधारक आणि स्थानिकांची ये-जा असते. सहाय्यक आयुक्त दीपक राऊत, यांनी सांगितले की, अनधिकृत फलकांवर कारवाई करताना लाकडी डोंगरांवर पण कारवाई होत आहे. यापुढे लाकडी डोंगर जप्तीची कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.



फलकांचे साहित्य पडीक


गल्लीतील कार्यकर्त्याचा वाढदिवस असो किंवा एखादा कार्यक्रम वा सण हल्ली नाक्यावर दाटीवाटीने फलक लावले जातात. ते लावण्यासाठी लाकडी बाबूंचे डोंगर उभे केले जातात. कार्यक्रम झाला तरी ते फलक तेथेच पडून राहतात. हे फलक पुणे महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. ते तात्काळ काढण्याची मागणी होत आहे. तसेच, मांडव टाकणाऱ्याचे साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाईची करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,