दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेत हल्लाबोल


नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री भाषणबाजी करण्यात मग्न होते. काँग्रेसचे महाराष्ट्रतील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिबुडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले, दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडली. देशाच्या सुरक्षेबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुंबईवर २६/११ वेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अद्याप देश सावरलेला नाही. इतका मोठा हल्ला झाला ज्यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. याबाबत संवदेना न दाखवता महाराष्ट्राचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बॉलिवुडच्या कलाकारांना घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते, हा संपूर्ण देशासाठी लाज आणणारा क्षण होता, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. दहशतवाद रोखण्यास काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र आज देश एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे. त्यामुळेच मागील १० वर्षात महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.


डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील पिडितांना न्याय देण्याचे काम केले. केंद्र सरकार दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. पहलगाम हल्ल्यात कल्याण मतदार संघातील तीन निर्दोश नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला, मात्र २००६ मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या १२७ नागरिकांचे कुटुंबिय आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, कारण या हल्ल्यातील आरोपी निर्दोष सुटले. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे पिडित कुटुंबियांना न्याय मिळाला नाही, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीने उबाठा पक्षाच्या एका उमेदवाराचा प्रचार केला होता, ते कुठल्या तोंडाने सरकारला जाब विचारतात, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, भाजप सरकारने लागू केलेला पोटा कायदा काँग्रेसने रद्द केला. हा कायदा रद्द् झाल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले वाढले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपीला परदेशी पलायन करण्यास काँग्रेस सरकारनेच मदत केली. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुबाबत काँग्रेसला सहानुभूती होती, मात्र प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले तेव्हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुखर्जींकडे मागणी केल्यानंतर अफजल गुरुला फाशी देण्यात आली. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ताज हॉटेलमध्ये बॉलिवुड कलाकारांना घेऊन गेले. तसेच तत्कालीन गृहमंत्र्यांनी मोठ्या शहरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री दिवसाला तीन तीनवेळा कपडे बदलण्यात मग्न होते, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या