२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली नाही- एस. जयशंकर

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सरकारने मांडली बाजू


नवी दिल्ली : पाकिस्ताकडून युद्ध बंदीचा प्रस्ताव आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले.


लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान, प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला या ऑपरेशनबद्दल सांगितले, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा धागा उलगडला.परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन ऑफ नॉन ग्राटा घोषित करण्यापर्यंत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या पावलांची यादी दिली.सदनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.


दूतावासांना माहिती देण्यासोबतच, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.


याबाबत एस.जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्हाला नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल माहिती दिली. आमची लाल रेषा ओलांडली गेली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त पाकिस्तानसह 3 देशांनी या ऑपरेशनला विरोध केल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. एस जयशंकर म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानने टीआरएफचा बचाव केला होता. गेल्या 7 मे रोजी सकाळी एक संदेश देण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आम्ही पाकिस्तानला कडक संदेश दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी