२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली नाही- एस. जयशंकर

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सरकारने मांडली बाजू


नवी दिल्ली : पाकिस्ताकडून युद्ध बंदीचा प्रस्ताव आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले.


लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान, प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला या ऑपरेशनबद्दल सांगितले, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा धागा उलगडला.परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन ऑफ नॉन ग्राटा घोषित करण्यापर्यंत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या पावलांची यादी दिली.सदनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.


दूतावासांना माहिती देण्यासोबतच, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.


याबाबत एस.जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्हाला नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल माहिती दिली. आमची लाल रेषा ओलांडली गेली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त पाकिस्तानसह 3 देशांनी या ऑपरेशनला विरोध केल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. एस जयशंकर म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानने टीआरएफचा बचाव केला होता. गेल्या 7 मे रोजी सकाळी एक संदेश देण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आम्ही पाकिस्तानला कडक संदेश दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा