२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली नाही- एस. जयशंकर

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सरकारने मांडली बाजू


नवी दिल्ली : पाकिस्ताकडून युद्ध बंदीचा प्रस्ताव आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले.


लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान, प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला या ऑपरेशनबद्दल सांगितले, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा धागा उलगडला.परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन ऑफ नॉन ग्राटा घोषित करण्यापर्यंत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या पावलांची यादी दिली.सदनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.


दूतावासांना माहिती देण्यासोबतच, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.


याबाबत एस.जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्हाला नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल माहिती दिली. आमची लाल रेषा ओलांडली गेली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त पाकिस्तानसह 3 देशांनी या ऑपरेशनला विरोध केल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. एस जयशंकर म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानने टीआरएफचा बचाव केला होता. गेल्या 7 मे रोजी सकाळी एक संदेश देण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आम्ही पाकिस्तानला कडक संदेश दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात