मँचेस्टर कसोटीनंतर बीसीसीआयने ऋषभ पंतबाबत केली ही घोषणा

  84

मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत ठरला. शेवटच्या बॉलपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेला ६६९ धावांचा विशाल स्कोर आणि भारतावरील ३११ धावांच्या आघाडीमुळे शुभमन सेनेवर पराभवाचे ढग घोंघावत होते. दरम्यान, भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली.


शुभमन गिलच्या १०३ धावा, रवींद्र जडेजाच्या नाबाद १०७ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाचव्या दिवशी थकवले. भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४२५ धावा केल्या. सामना संपताच ऋषभ पंतच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळण्याबाबत मोठे अपडेटही दिले.



टाच फ्रॅक्चर झालेली असतानाही ऋषभ पंतची कमाल


सामन्यातील पहिल्या डावात भारताला साडेतीनशेहून अधिक धावांची खेळी करून देण्यात मोलाचा वाटा ठरतो तो ऋषभ पंतचा. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतला फलंदाजीदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. त्याला मध्येच मैदान सोडावे लागले होते. सुरूवातीच्या रिपोर्ट्समध्ये त्याच्या टाचेला दुखापत झाल्याचे दिसत होते.


पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने ३७ धावा केल्या होत्या. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो पुन्हा फलंदाजी करेल असे वाटत नव्हते. मात्र पंतने आपले खेळाप्रतीचे प्रेम दाखवत दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीचा निर्णय घेतला. तो लंगडत मैदानात आला आणि त्याने फलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या दुखणाऱ्या पायाला निशाणा बनवण्याचे ठरवले मात्र त्याने समजुतीने फलंदाजी केली.



बीसीसीआयची मोठी घोषणा


जसा सामना अनिर्णीत ठरल्याची घोषणा झाली. त्यानतंर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली की ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम सातत्याने त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असणार आहे. पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये पंतच्या जागी नारायण जगदीशनला सामील करण्यात आले आहे. हा सामना ३१ जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. मालिकेत सध्या इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.