मँचेस्टर कसोटीनंतर बीसीसीआयने ऋषभ पंतबाबत केली ही घोषणा

मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत ठरला. शेवटच्या बॉलपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेला ६६९ धावांचा विशाल स्कोर आणि भारतावरील ३११ धावांच्या आघाडीमुळे शुभमन सेनेवर पराभवाचे ढग घोंघावत होते. दरम्यान, भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली.


शुभमन गिलच्या १०३ धावा, रवींद्र जडेजाच्या नाबाद १०७ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाचव्या दिवशी थकवले. भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४२५ धावा केल्या. सामना संपताच ऋषभ पंतच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळण्याबाबत मोठे अपडेटही दिले.



टाच फ्रॅक्चर झालेली असतानाही ऋषभ पंतची कमाल


सामन्यातील पहिल्या डावात भारताला साडेतीनशेहून अधिक धावांची खेळी करून देण्यात मोलाचा वाटा ठरतो तो ऋषभ पंतचा. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतला फलंदाजीदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. त्याला मध्येच मैदान सोडावे लागले होते. सुरूवातीच्या रिपोर्ट्समध्ये त्याच्या टाचेला दुखापत झाल्याचे दिसत होते.


पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने ३७ धावा केल्या होत्या. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो पुन्हा फलंदाजी करेल असे वाटत नव्हते. मात्र पंतने आपले खेळाप्रतीचे प्रेम दाखवत दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीचा निर्णय घेतला. तो लंगडत मैदानात आला आणि त्याने फलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या दुखणाऱ्या पायाला निशाणा बनवण्याचे ठरवले मात्र त्याने समजुतीने फलंदाजी केली.



बीसीसीआयची मोठी घोषणा


जसा सामना अनिर्णीत ठरल्याची घोषणा झाली. त्यानतंर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली की ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम सातत्याने त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असणार आहे. पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये पंतच्या जागी नारायण जगदीशनला सामील करण्यात आले आहे. हा सामना ३१ जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. मालिकेत सध्या इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना