एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू : मंत्री छगन भुजबळ

  65

नाशिक : सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू . त्यांना योग्य वेतन आणि आरोग्य सेवा देऊ , असे भुजबळ यांनी आश्वासन दिले .


या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, गिरीश पालवे, सुधाकर बडगुजर, सतीश मेटकरी, भाऊलाल तांबडे, व्यंकटेश मोरे, पद्मश्री राजे, अनुप खैरनार, राहुल आरोटे यांच्यासह सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'गोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत.या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील'



एसटी सामान्यांच्या सेवेसाठी


भुजबळ पुढे म्हणाले की, जगातील कुठेलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. एसटी म्हणजे एक लोकसेवा आहे. गोर गरिबांची सेवा करण्यासाठी ती महत्वाची वाहिनी आहे त्यामुळे ही सेवा संस्था असून या ती फायद्यात कधी येईल याची वाट पाहत बसता येणार नाही. आवश्यक त्या तरतुदी एसटीसाठी कराव्याच लागणार आहेत.


एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहे या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने देखील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात देखील याबाबत बोलून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे आवाहन त्यांनी केले .

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली