एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू . त्यांना योग्य वेतन आणि आरोग्य सेवा देऊ , असे भुजबळ यांनी आश्वासन दिले .


या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, गिरीश पालवे, सुधाकर बडगुजर, सतीश मेटकरी, भाऊलाल तांबडे, व्यंकटेश मोरे, पद्मश्री राजे, अनुप खैरनार, राहुल आरोटे यांच्यासह सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'गोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत.या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील'



एसटी सामान्यांच्या सेवेसाठी


भुजबळ पुढे म्हणाले की, जगातील कुठेलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. एसटी म्हणजे एक लोकसेवा आहे. गोर गरिबांची सेवा करण्यासाठी ती महत्वाची वाहिनी आहे त्यामुळे ही सेवा संस्था असून या ती फायद्यात कधी येईल याची वाट पाहत बसता येणार नाही. आवश्यक त्या तरतुदी एसटीसाठी कराव्याच लागणार आहेत.


एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहे या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने देखील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात देखील याबाबत बोलून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे आवाहन त्यांनी केले .

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये