धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाल्याने माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात! अजित पवार काय म्हणाले?

अहिल्यानगर: वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले आहे. विरोधक त्यावरून कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असताना, इथे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून (Santosh Deshmukh Murder Case) क्लीनचीट मिळाल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकाटे यांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना घेतले जाणार का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र याबद्दल कोण निर्णय घेणार? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहुरी येथे अरुण तरपुरे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळाव्यानंतर अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. ज्यात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आपले स्पष्ट मत सांगितले



धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत अजित पवार यांचे स्पष्ट मत


धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान करत निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलावला. तसेच वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वरील कारवायाच्या निर्णयाबाबतही मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील, असे सांगून कोकाटेंवर कारवाई होणार की, अभय मिळणार याची उत्सुकता देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली.


धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा भाजप (BJP) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होण्याच्या चर्चांचा जोर आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, "याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. मी याबाबत एवढेच बोललो आहे की, त्यांच्या संदर्भात न्यायालयीन व राज्य सरकार मार्फत चौकशी जी सुरू होती, त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मंत्रिमंडळात कोण असावे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ".

Comments
Add Comment

Shiv Sena and BVA : शिवसेना आणि 'बविआ'चे जुळण्याआधीच फिस्कटले

विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम; हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना मुंबई : विधानपरिषद

NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यात खडाजंगी

प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही गैरहजर; पार्थ पवार यांनीही बैठकीतून घेतला काढता पाय मुंबई : अजित पवार यांच्या

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Devendra Fadnavis : 'इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या मोठी वाढ झाली आहे.

Eknath Shinde : मोदी खरे धुरंधर, त्यांच्यावर टीका करणारे..., हर्षवर्धन सकपाळांच्या मोदींवरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील बारा वर्षांत देशाने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक