IND vs ENG: ५५ वर्षांनी घडले असे काही...केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १७४ धावांची भागीदारी करत भारताला अडचणीत असताना सांभाळले. कारण ३११ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडने भारताचे २ विकेट पहिल्या षटकांतच मिळवले होते. राहुल आणि गिल यांनी मिळून असे काही केले की जे गेल्या ५५वर्षात घडले नाही.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानुसार ५५ वर्षांपूर्वी असे पाहायला मिळाले होते की परदेशी दौऱ्यावर एका कसोटी मालिकेत दोन फलंदाजांनी ५००हून अधिक धावा केल्यात. १९७०-७१मध्ये सुनील गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब राहिली. क्रिस वोक्सने पहिल्याच षटकांत चौथ्या बॉलवर यशस्वी जायसवाल आणि पाचव्या बॉलवर साई सुदर्शनला बाद केले होते. मात्र यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि गिल यांनी विकेट वाचवून ठेवली.

केएल राहुलने २१० चेंडूचा सामना करताना ८७ धावा केल्या. गिलने १६७ चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. दोघेही आज आपले शतक पूर्ण करू शकतात. भारत आता हा सामना जिंकू शकत नाहीत. मात्र पराभवापासून बचावासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावीच लागेल.
Comments
Add Comment

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या