IND vs ENG: ५५ वर्षांनी घडले असे काही...केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १७४ धावांची भागीदारी करत भारताला अडचणीत असताना सांभाळले. कारण ३११ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडने भारताचे २ विकेट पहिल्या षटकांतच मिळवले होते. राहुल आणि गिल यांनी मिळून असे काही केले की जे गेल्या ५५वर्षात घडले नाही.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानुसार ५५ वर्षांपूर्वी असे पाहायला मिळाले होते की परदेशी दौऱ्यावर एका कसोटी मालिकेत दोन फलंदाजांनी ५००हून अधिक धावा केल्यात. १९७०-७१मध्ये सुनील गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब राहिली. क्रिस वोक्सने पहिल्याच षटकांत चौथ्या बॉलवर यशस्वी जायसवाल आणि पाचव्या बॉलवर साई सुदर्शनला बाद केले होते. मात्र यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि गिल यांनी विकेट वाचवून ठेवली.

केएल राहुलने २१० चेंडूचा सामना करताना ८७ धावा केल्या. गिलने १६७ चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. दोघेही आज आपले शतक पूर्ण करू शकतात. भारत आता हा सामना जिंकू शकत नाहीत. मात्र पराभवापासून बचावासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावीच लागेल.
Comments
Add Comment

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर