IND vs ENG: ५५ वर्षांनी घडले असे काही...केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून बनवला हा रेकॉर्ड

  749

मुंबई: शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १७४ धावांची भागीदारी करत भारताला अडचणीत असताना सांभाळले. कारण ३११ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडने भारताचे २ विकेट पहिल्या षटकांतच मिळवले होते. राहुल आणि गिल यांनी मिळून असे काही केले की जे गेल्या ५५वर्षात घडले नाही.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानुसार ५५ वर्षांपूर्वी असे पाहायला मिळाले होते की परदेशी दौऱ्यावर एका कसोटी मालिकेत दोन फलंदाजांनी ५००हून अधिक धावा केल्यात. १९७०-७१मध्ये सुनील गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब राहिली. क्रिस वोक्सने पहिल्याच षटकांत चौथ्या बॉलवर यशस्वी जायसवाल आणि पाचव्या बॉलवर साई सुदर्शनला बाद केले होते. मात्र यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि गिल यांनी विकेट वाचवून ठेवली.

केएल राहुलने २१० चेंडूचा सामना करताना ८७ धावा केल्या. गिलने १६७ चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. दोघेही आज आपले शतक पूर्ण करू शकतात. भारत आता हा सामना जिंकू शकत नाहीत. मात्र पराभवापासून बचावासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावीच लागेल.
Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.