IND vs ENG: ५५ वर्षांनी घडले असे काही...केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १७४ धावांची भागीदारी करत भारताला अडचणीत असताना सांभाळले. कारण ३११ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडने भारताचे २ विकेट पहिल्या षटकांतच मिळवले होते. राहुल आणि गिल यांनी मिळून असे काही केले की जे गेल्या ५५वर्षात घडले नाही.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानुसार ५५ वर्षांपूर्वी असे पाहायला मिळाले होते की परदेशी दौऱ्यावर एका कसोटी मालिकेत दोन फलंदाजांनी ५००हून अधिक धावा केल्यात. १९७०-७१मध्ये सुनील गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब राहिली. क्रिस वोक्सने पहिल्याच षटकांत चौथ्या बॉलवर यशस्वी जायसवाल आणि पाचव्या बॉलवर साई सुदर्शनला बाद केले होते. मात्र यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि गिल यांनी विकेट वाचवून ठेवली.

केएल राहुलने २१० चेंडूचा सामना करताना ८७ धावा केल्या. गिलने १६७ चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. दोघेही आज आपले शतक पूर्ण करू शकतात. भारत आता हा सामना जिंकू शकत नाहीत. मात्र पराभवापासून बचावासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावीच लागेल.
Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना