IND vs ENG :  जडेजा-सुंदरच्या शतकाने इंग्लंडच्या नाकात आणला दम, भारताने कसोटी अनिर्णीत राखण्यात मिळवले यश

  75

मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र हा सामना भारतासाठी अनेक बाबतीत ऐतिहासिक ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्यानंतरही भारतासमोर ३११ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात दोन झटके बसले होते. अशातच भारतासमोर पराभवाचे ढग घोंगावत होते.  मात्र केएल राहुल आणि गिल यांच्यातील १८८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर जडेजा आणि सुंदर यांच्यातील झुंजार खेळीने इंग्लंडच्या नाकात दम आणला.


पाचव्या आणि शेवटचा दिवस संपेपर्यंत भारताने ४ विकेट गमावत ४२५ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजाने नाबाद १०७ धावा केल्या होत्या. तर सुंदरने १०१ धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या होत्या. यजमान इंग्लंडवर भारताने ३११ धावांची आघाडी केली होती. याआधी भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ३५८ धावाच करू शकली होती. दरम्यान, ड्रॉनंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ अशा पिछाडीवर आहे. दरम्यान, इंग्लंडचे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहील कारण ५व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत संपेल.



असा होता भारताचा दुसरा डाव


भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब राहिली. त्यांचे पहिले दोन विकेट पहिल्याच षटकात पडले. सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि साई सुदर्शन खाते न खोलताच बाद झाले. दोघेही फलंदाज क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाले. दोन विकेट पडल्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारतीय संघाला सांभाळले. शुभमन गिलने शतक ठोकले तर केएल राहुल शतकापासून वंचित राहिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांची जोडी मैदानावर जमली. या दोघांमध्ये कमालीची भागीदारी झाली आणि त्यांनी भारतीय संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल