...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी


हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मनसा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या आवारात आणि पायऱ्यांवर गर्दी झाली होती. रांग हळू हळू पुढे सरकत होती. याच सुमारास विजेची तार तुटल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. 'करंटवाली तार सीढियोंपर गिरी है' असं ओरडत कोणीतरी आलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि सात मुले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


मंदिराच्या इमारतीत जाण्या - येण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरुन चालत ये - जा करावी लागते. यामुळे त्याच मार्गावर चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अफवा पसरली आणि प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने धावत सुटले. यामुळे गोंधळ झाला, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक आहेत.


सर्व जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती याआधारे तपास सुरू आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


न्यायदंडाधिकारी चौकशी करणार


चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशी करतील. अहवाल आला की दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातलगांना नियमानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल; असेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.


Comments
Add Comment

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.