...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी


हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मनसा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या आवारात आणि पायऱ्यांवर गर्दी झाली होती. रांग हळू हळू पुढे सरकत होती. याच सुमारास विजेची तार तुटल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. 'करंटवाली तार सीढियोंपर गिरी है' असं ओरडत कोणीतरी आलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि सात मुले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


मंदिराच्या इमारतीत जाण्या - येण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरुन चालत ये - जा करावी लागते. यामुळे त्याच मार्गावर चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अफवा पसरली आणि प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने धावत सुटले. यामुळे गोंधळ झाला, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक आहेत.


सर्व जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती याआधारे तपास सुरू आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


न्यायदंडाधिकारी चौकशी करणार


चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशी करतील. अहवाल आला की दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातलगांना नियमानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल; असेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे