...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी


हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मनसा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या आवारात आणि पायऱ्यांवर गर्दी झाली होती. रांग हळू हळू पुढे सरकत होती. याच सुमारास विजेची तार तुटल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. 'करंटवाली तार सीढियोंपर गिरी है' असं ओरडत कोणीतरी आलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि सात मुले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


मंदिराच्या इमारतीत जाण्या - येण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरुन चालत ये - जा करावी लागते. यामुळे त्याच मार्गावर चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अफवा पसरली आणि प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने धावत सुटले. यामुळे गोंधळ झाला, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक आहेत.


सर्व जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती याआधारे तपास सुरू आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


न्यायदंडाधिकारी चौकशी करणार


चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशी करतील. अहवाल आला की दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातलगांना नियमानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल; असेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.


Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे