समुद्रात बुडाली बोट, रायगडचे पाचजण नऊ तास पोहून किनाऱ्यावर पोहोचले


उरण : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत. बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


पावसाळ्यात समुद्रात मासेमारी करणे टाळतात. राज्य शासनाने समुद्राला उधाण येते म्हणून काही आठवडे सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करुन आठ मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न मच्छिमारांना भोवला. बोट खोल समुद्रात असताना तुफान वारा आला आणि उंचच उंच लाटा उसळू लागल्या. या प्रतिकूल परिस्थितीत बोट टिकाव धरू शकली नाही आणि बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत.


बोटीत असलेले सर्व मच्छिमार उरण तालुक्यातील आपटा, करंजा आणि हावरे कोळीवाड्यातील आहेत. बोट उरण येथून अलिबागमधील खांदेरीच्या दिशेने जात असताना बुडाली. बोट बुडाल्यावर पोहत किनारा गाठणाऱ्या पाच जणांना मांडवा पोलिसांनी अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या ३ मच्छिमारांचा शोध सुरू आहे. तटरक्षक दल, स्थानिक बचाव यंत्रणा आणि ड्रोन यांच्या मदतीने बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

Eknath Shinde : गावदेवी मार्केट आग, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

ठाणे : शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका

Egg Donation Case : तब्बल ३७ वेळा स्त्री बीज दान, बदलापूर प्रकरणी ५ हजार पानांचे आरोपपत्र ; १५ जणांवर गुन्हा

उल्हासनगर  : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ

UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

USA Invest In India : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे