समुद्रात बुडाली बोट, रायगडचे पाचजण नऊ तास पोहून किनाऱ्यावर पोहोचले


उरण : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत. बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


पावसाळ्यात समुद्रात मासेमारी करणे टाळतात. राज्य शासनाने समुद्राला उधाण येते म्हणून काही आठवडे सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करुन आठ मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न मच्छिमारांना भोवला. बोट खोल समुद्रात असताना तुफान वारा आला आणि उंचच उंच लाटा उसळू लागल्या. या प्रतिकूल परिस्थितीत बोट टिकाव धरू शकली नाही आणि बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत.


बोटीत असलेले सर्व मच्छिमार उरण तालुक्यातील आपटा, करंजा आणि हावरे कोळीवाड्यातील आहेत. बोट उरण येथून अलिबागमधील खांदेरीच्या दिशेने जात असताना बुडाली. बोट बुडाल्यावर पोहत किनारा गाठणाऱ्या पाच जणांना मांडवा पोलिसांनी अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या ३ मच्छिमारांचा शोध सुरू आहे. तटरक्षक दल, स्थानिक बचाव यंत्रणा आणि ड्रोन यांच्या मदतीने बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक