‘अटल सेतू’मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

  74

आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास


मुंबई  : अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरून तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.


अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल पुलावरून एकूण १,३१,६३,१७७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यापैकी १.२ कोटींपेक्षा जास्त गाड्या या खासगी गाड्या आहेत. अटल सेतूवरील वाहतुकीपैकी ९१ टक्के प्रवास खासगी वाहनांनी झाला आहे.


उर्वरित वाहतुकीमध्ये हलकी वाहने (एलसीव्ही मिनीबस), बस, ट्रक, मल्टी-अॅक्सल वाहने यांच्यासह मोठ्या आकाराच्या वाहनांचा समावेश आहे. एलसीव्ही मिनीबसने अटल सेतूवर १,७१७११ फेऱ्या मारल्या आहेत. २-अ‍ॅक्सल बस आणि ट्रकने २,०२,८६४ फेऱ्या मारल्या आहेत. मध्यम-जड मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांनी एकत्रितपणे ७,००,९८९ फेऱ्यांचा प्रवास केला आहे. १,५३७ मोठ्या आकाराच्या वाहनांनी अटल सेतूने प्रवास केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी अटल सेतूचे उद्घाटन केले होते. एकूण २२ किमी लांबीपैकी ही लिंक १६.५ किमी समुद्रावरुन आणि ५.५ किमी जमिनीवरुन जाते. देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरून फक्त २० मिनिटांवर आला आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना