‘अटल सेतू’मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास


मुंबई  : अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरून तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.


अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल पुलावरून एकूण १,३१,६३,१७७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यापैकी १.२ कोटींपेक्षा जास्त गाड्या या खासगी गाड्या आहेत. अटल सेतूवरील वाहतुकीपैकी ९१ टक्के प्रवास खासगी वाहनांनी झाला आहे.


उर्वरित वाहतुकीमध्ये हलकी वाहने (एलसीव्ही मिनीबस), बस, ट्रक, मल्टी-अॅक्सल वाहने यांच्यासह मोठ्या आकाराच्या वाहनांचा समावेश आहे. एलसीव्ही मिनीबसने अटल सेतूवर १,७१७११ फेऱ्या मारल्या आहेत. २-अ‍ॅक्सल बस आणि ट्रकने २,०२,८६४ फेऱ्या मारल्या आहेत. मध्यम-जड मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांनी एकत्रितपणे ७,००,९८९ फेऱ्यांचा प्रवास केला आहे. १,५३७ मोठ्या आकाराच्या वाहनांनी अटल सेतूने प्रवास केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी अटल सेतूचे उद्घाटन केले होते. एकूण २२ किमी लांबीपैकी ही लिंक १६.५ किमी समुद्रावरुन आणि ५.५ किमी जमिनीवरुन जाते. देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरून फक्त २० मिनिटांवर आला आहे.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर