प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिल कॉर्नर येथील सचिन राजू भिसे या प्रियकराला अटक करण्यात आली असून, त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणीची जानेवारी २०२५ मध्ये त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉय सचिनसोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या वडिलांनी या लग्नाला विरोध करत तिला सचिनशी संबंध तोडण्यास सांगितले होते.



वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने सचिनला याची कल्पना दिली. परंतु, सचिनने दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत मुलीकडे आणि तिच्या आईकडे पैशांची मागणी सुरू केली आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.


दरम्यान, ही मुलगी तिच्या आईसोबत बाहेर गेली होती, परंतु ती रस्त्यातूनच घरी परतली. बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी आत जाऊन पाहिले असता, तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सचिनविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या