पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस

शहापाडा धरण ओव्हर फ्लो, तर हेटवणे, आंबेघर धरणांची पातळी वाढली


स्वप्नील पाटील


पेण: मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता या पावसाच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर ती तीनही धरणे भरली आहेत. यातील शहापाडा धरण ओव्हर फ्लो झाला असून हेटवणे आणि आंबेघर धरणांची पातळी वाढली आहे. ही पातळी वाढली असली तरी पेण तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याउलट आजमितीला पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.


पेण तालुक्यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो वाहू लागल्याने याठिकाणी धरणाच्या पायथ्याशी पावसाचा आणि धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. तालुक्यातील तीनही धरणांचा विचार करता या तालुक्यात एवढी मोठी धरणे असून देखील येथील खारेपाट भागात उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले असते. पैकी आंबेघर धरण हे असे धरण आहे की त्याचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरत आणले जात नाही.


पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाचे पाणी असेच वाया जाते. या पाण्याचा कुठेतरी वापर करण्यासाठी तजवीज करावी असा विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही. हेटवणे धरणाची १४४.९८ मिलिमीटर क्युबिक एवढी क्षमता असून आजमितीला या धरणात ८०.६५ मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे, तर शहापाडा धरण हे ओव्हरफ्लो होऊन भरत आहे. मात्र सध्याच्या पडणाऱ्या पावसामुळे कुठेही पाणी पातळीत वाढ झाली नसून पेण तालुक्यातील नदीकाठच्या कोणत्याही भागाला धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित