पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस

शहापाडा धरण ओव्हर फ्लो, तर हेटवणे, आंबेघर धरणांची पातळी वाढली


स्वप्नील पाटील


पेण: मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता या पावसाच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर ती तीनही धरणे भरली आहेत. यातील शहापाडा धरण ओव्हर फ्लो झाला असून हेटवणे आणि आंबेघर धरणांची पातळी वाढली आहे. ही पातळी वाढली असली तरी पेण तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याउलट आजमितीला पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.


पेण तालुक्यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो वाहू लागल्याने याठिकाणी धरणाच्या पायथ्याशी पावसाचा आणि धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. तालुक्यातील तीनही धरणांचा विचार करता या तालुक्यात एवढी मोठी धरणे असून देखील येथील खारेपाट भागात उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले असते. पैकी आंबेघर धरण हे असे धरण आहे की त्याचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरत आणले जात नाही.


पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाचे पाणी असेच वाया जाते. या पाण्याचा कुठेतरी वापर करण्यासाठी तजवीज करावी असा विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही. हेटवणे धरणाची १४४.९८ मिलिमीटर क्युबिक एवढी क्षमता असून आजमितीला या धरणात ८०.६५ मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे, तर शहापाडा धरण हे ओव्हरफ्लो होऊन भरत आहे. मात्र सध्याच्या पडणाऱ्या पावसामुळे कुठेही पाणी पातळीत वाढ झाली नसून पेण तालुक्यातील नदीकाठच्या कोणत्याही भागाला धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने