पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस

शहापाडा धरण ओव्हर फ्लो, तर हेटवणे, आंबेघर धरणांची पातळी वाढली


स्वप्नील पाटील


पेण: मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता या पावसाच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर ती तीनही धरणे भरली आहेत. यातील शहापाडा धरण ओव्हर फ्लो झाला असून हेटवणे आणि आंबेघर धरणांची पातळी वाढली आहे. ही पातळी वाढली असली तरी पेण तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याउलट आजमितीला पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.


पेण तालुक्यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो वाहू लागल्याने याठिकाणी धरणाच्या पायथ्याशी पावसाचा आणि धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. तालुक्यातील तीनही धरणांचा विचार करता या तालुक्यात एवढी मोठी धरणे असून देखील येथील खारेपाट भागात उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले असते. पैकी आंबेघर धरण हे असे धरण आहे की त्याचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरत आणले जात नाही.


पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाचे पाणी असेच वाया जाते. या पाण्याचा कुठेतरी वापर करण्यासाठी तजवीज करावी असा विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही. हेटवणे धरणाची १४४.९८ मिलिमीटर क्युबिक एवढी क्षमता असून आजमितीला या धरणात ८०.६५ मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे, तर शहापाडा धरण हे ओव्हरफ्लो होऊन भरत आहे. मात्र सध्याच्या पडणाऱ्या पावसामुळे कुठेही पाणी पातळीत वाढ झाली नसून पेण तालुक्यातील नदीकाठच्या कोणत्याही भागाला धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग