Chinnaswamy Stadium declared unsafe: बेंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षित नाही! चौकशी अहवालात मोठा खुलासा

बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित


बेंगळुरू: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या जेतेपदानंतर, बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी मिरवणूक सुरू असतानाच चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले.


चिन्नास्वामी चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आला. कर्नाटक मंत्रिमंडळाने या न्यायिक आयोगाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी दिली. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, न्यायिक आयोगाच्या अहवालात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.



अहवालात काय म्हंटले आहे?


अहवालात बेंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियमला मूलभूतपणे असुरक्षित म्हटले आहे. यात म्हटले आहे की चिन्नास्वामी स्टेडियमची सध्याची रचना मोठ्या स्पर्धांसाठी अयोग्य आणि धोकादायक आहे. स्टेडियममध्ये पुरेसे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे नाहीत. थोडक्यात काय तर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन निर्वासन योजना तैनात करण्यात आलेल्या नाही. स्टेडियमभोवतीचे रस्ते खूप वर्दळीचे आहेत. तसेच, पार्किंगसाठी देखील मर्यादित जागा आहे.



विश्वचषक आणि आयपीएल सामन्यांबद्दल शंका!


महिला विश्वचषक २०२५ चे किमान ४ सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. जर पाकिस्तानी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर विजेतेपदाचा सामना देखील येथे खेळला जाईल. तसेच, चिन्नास्वामी स्टेडियम पुढील वर्षी आयपीएल (Indian Premier League) आणि डब्ल्यूपीएल (Women Premier League) सामने आयोजित करणार आहे. मात्र,, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि इतर सामन्यांच्या आयोजनावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.



बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण संबंधित आरोपींवर कारवाईचा मार्ग मोकळा


कर्नाटक सरकारने न्यायालयीन आयोगाच्या अहवालाला मान्यता दिल्याने, आरसीबी, केएससीए (Karnataka Cricket Association), डीएनए एंटरटेनमेंट आणि बंगळुरू पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. अहवालानुसार, विजय परेड दरम्यान, मैदानावर फक्त ७९ पोलिस तैनात होते, बाहेर कोणीही नव्हते. रुग्णवाहिका देखील नव्हती आणि घटनेच्या ३० मिनिटांनंतर संयुक्त पोलिस आयुक्त पोहोचले. न्यायालयीन आयोगाने शिफारस केली आहे की मोठे कार्यक्रम केवळ आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके पूर्ण करणाऱ्या स्टेडियममध्येच आयोजित केले जावेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या