IND vs ENG 4th Test: टीम इंडियाचं दमदार पुनरागमन! गिल-राहुल शतकाच्या जवळ

  77

चौथ्या दिवसाचा खेळ संपला, २ विकेट गमावत भारताच्या १७४ धावा, राहुल आणि गिलने सावरले


मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडने ७ गडी बाद ५४४ धावांचा डोंगर भारतासमोर उभा केला. ज्यासह इंग्लंडने १८६ धावांची आघाडी घेतली. त्याला उत्तर म्हणून चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्याच षटकात दोन विकेट गमावले. ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन बाद होऊन माघारी परतला आहे. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि के एल राहुलने टीम इंडियाचा गडबडलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला.



शुभमन गिल- केएल राहुलची दमदार खेळी


या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात २ मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले. भारतीय संघाला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने मिळून १७४ धावा करत टीम इंडियाची ढासळलेली फलंदाजी सावरली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १७४ धावा केल्या आहेत. केएल राहुल ८७ धावांवर नाबाद आहे. तर शुबमन गिल ७८ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना पाचव्या दिवशी शतक झळकावण्याची संधी असणार आहे. इंग्लंडकडे अजूनही १३७ धावांची आघाडी आहे.


Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल