ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अर्जुन सुभेदारने सांगितलं नेमकं काय घडणार

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. मालिकेत सुरू असलेल्या वात्सल्य आश्रमातील विलासच्या खून प्रकरणाच्या कोर्ट केसचा निकाल येत्या 30 जुलै रोजी लागणार असल्याने, ही मालिका संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, मालिकेतील प्रमुख कलाकारांनी व्हिडीओद्वारे या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


कोर्ट केस संपणार, पण मालिका नाही!


याबाबत खुद्द अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने स्पष्टीकरण दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अमित भानुशालीने सांगितले की, "बऱ्याच लोकांनी असे विचारले की, कोर्ट केस संपणार आहे तर मालिकाही संपतेय की काय? तर, असं अजिबात नाही आहे! मालिका संपत नाहीये, फक्त मधुभाऊंची जी केस आहे, ती संपणार."





तो पुढे म्हणाला की, "अडीच-पावणे तीन वर्ष लागली या कोर्ट केसला संपायला... पण यानंतरही बरंच काही बाकी आहे." भानुशालीने स्पष्ट केले की, खरी तन्वी कोण आहे, सायलीच खरी तन्वी आहे का आणि नागराज-महिपत यांच्या केससुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात वकिलाच्या वेशात दिसणार आहे. "तुमचं इतकं प्रेम आहे, इतकी माया आहे की, शो कधीच संपणार नाही," असे म्हणत त्याने प्रेक्षकांना आश्वस्त केले.


काय आहे सध्याचा 'ठरलं तर मग' मालिकेतील पेच?


'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सध्या वात्सल्य आश्रमात जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या विलासच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या प्रकरणात अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख हे दोन प्रमुख वकील आमनेसामने आहेत. साक्षी, प्रिया आणि महिपत या त्रिकुटाचा खोटेपणा उघडकीस आणून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन अथक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, दामिनीला कोणत्याही मार्गाने साक्षीला वाचवायचे आहे. आतापर्यंतच्या एपिसोड्स आणि प्रोमोवरून हे जवळपास निश्चित झाले आहे की, निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागेल.


अर्जुनसह मालिकेतील प्रताप, चैतन्य आणि अस्मिता यांसारख्या इतर कलाकारांनीही 'ठरलं तर मग' मालिका संपणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, या व्हिडिओंवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांना आता पुढील भागांमध्ये काय रहस्य उलगडणार याची उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.