Mumbai Airport : “थोड्याच वेळात धमाका होणार!” मुंबई एअरपोर्टला धमकीचे ३ कॉल; सुरक्षा यंत्रणांची धाबे दणाणली!

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एकामागोमाग ३ वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे सगळी खळबळ उडाली. या कॉलनंतर, मुंबई पोलिसांचे पथक तातडीनं सतर्क झाले आणि पोलिस अधिकारी, तसेच बॉम्ब शोध पथकाने विमानतळ गाठलं. प्रत्येक तास सखोल शोध घेऊन मोहीम राबवण्यात आली, मात्र एअरपोर्टवर कुठेही, काहीच संशयास्पद आढळून आलेलं नाही.


पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.



आसाम-बंगाल सीमेशी सक्रिय असलेले कॉल


प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलंय की, हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेजवळ सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून केले गेले होते. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास तात्काळ सुरू केला. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतील यासाठी तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व

बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी

Maharashtra Government : महाराष्ट्रात आता ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ची क्रांती

राज्य सरकारकडून 'स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६' जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारनिर्मिती

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले