चांगली कामगिरी करणाऱ्या १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर



नवी दिल्ली : लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या विविध पक्षांच्या १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच संसदेत सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या चार जणांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एनके प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र) आणि श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली आहे.

संसदेत उत्तम कामगिरी करणाऱ्या रवी किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), स्मिता उदय वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप) आणि दिलीप सैकिया (भाजप), अरविंद सावंत (शिउबाठा), , नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस) यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत.

समिती श्रेणीमध्ये, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त स्थायी समिती आणि डॉ. चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) यांच्या अध्यक्षतेखालील कृषी स्थायी समितीला त्यांच्या अहवालांच्या गुणवत्तेसाठी आणि कायदेविषयक देखरेखीतील योगदानासाठी सन्मानित केले जाईल.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै २०२५ पासून सुरू आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्या आठवड्याचा बराच वेळ वाया गेला आहे. आता पुढच्या आठवड्यात संसदेत ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा नियोजीत आहे. या चर्चेवेळी काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत