रायगड जिल्ह्यात विस्तारणार भूमीगत वीज वाहिन्यांचे जाळे

कोकण आपत्ती सौमीकरण योजनेतून ६२१ कोटींचा खर्च


१२६४ किलोमीटर असणार विद्युत वाहिनीची एकूण लांबी


सुभाष म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात भूमीगत वीज वाहिनीचे जाळे विस्तारीत करण्यात येणार आहे. अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर जिल्ह्यात सर्व्हेचे काम सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्यांना आळा बसणार आहे.


रायगड जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होणे ही दररोजचीच समस्या होऊन बसल्याने यावर उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ६२१.६७ कोटी रुपये खर्चून तालुक्याच्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. कोकण आपत्ती सौमीकरण योजनेतून रायगड जिल्ह्यात १२६४.२३ किलोमीटर लांबीची भूमिगत विद्युत वाहिनीचे हे काम होणार असून, अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर इतर ठिकाणीही ही योजना राबविण्यासाठी सर्व्हे केला जात आहे.


हा प्रकल्प राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प अंतर्गत राबविला जात आहे. जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी आर्थिकसाह्य मिळत असून, यामध्ये ७५ टक्के जागतिक बँक आणि २५ टक्के केंद्र सरकारचा वाटा असणार आहे. यातील सर्वात जास्त ७१५ किलोमीटरची विद्युत वाहिनी श्रीवर्धन तालुक्यात टाकली जाणार आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यात मोठे नुकसान झाले होते.


तब्बल तीन महिने अंधारात राहिलेल्या श्रीवर्धन शहरासह आजुबाजूच्या गावांमध्ये विद्युत वाहिनीचे जाळे विणण्यासाठी तब्बल २८५ कोटी रुपये खर्च केले जातील. त्याचबरोबर पेण, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि उरण तालुक्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. खालापूर, कर्जत, सुधागड या तीन तालुक्यांना यातून वगळण्यात आले आहे.


कोकण आपत्ती सौमीकरण योजनेच्या पॅकेज एक मधून अलिबाग आणि आसपासच्या किनारपट्टी भागांमध्ये, भूमिगत विद्युत वाहिनी योजना राबवण्यात आली आहे. अलिबाग-१ आणि अलिबाग-२ अशा दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या या योजनेतून १२२.२५ किलोमीटरची विद्युत वाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वादळे आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या व्यत्ययांवर मात करणे, तसेच विद्युत अपघातांचा धोका कमी करणे आणि शहराचे सौंदर्य वाढविणे हा आहे.


वादळ, अतिवृष्टी, पूर यासारख्या आपत्तींमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, विजेचे खांब पडणे, तारा तुटणे आणि वीज पुरवठा खंडित होणे टाळणे, वीज अपघातांचा धोका कमी करणे, शहरी भागातील विजेच्या तारांचे जाळे जमिनीखाली गेल्याने शहराचे सौंदर्य वाढविणे, वीजचोरी कमी करणे, वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय करणे या योजनेचे तपशील आहेत.



विद्युत वाहिन्यांची लांबी (कि.मी.मध्ये)



  • पेण          २३.७३ कि.मी.

  • मुरुड       ९८.९५ कि.मी.

  • रोहा         १५.०० कि.मी.

  • तळा         २२.५० कि.मी.

  • माणगाव   १२.०० कि.मी.

  • म्हसळा     २०२ कि.मी.

  • श्रीवर्धन     ७१५ कि.मी.

  • महाड       ६१.५०, मी.

  • पोलादपूर  ३०.५० कि.मी.

  • उरण         ८३.०५ कि.मी.

  • एकूण        १२६४.२३ कि.मी.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग