Mumbai Traffic Alert : पावसामुळे वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा

मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून, वाहतूक कोंडीने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे म्हणून तो बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.



लांबच लांब रांगा


मुंबईच्या वाहतुकीचा महत्वाचा कणा मानला जातो तो म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग, तो आज सकाळपासूनच ठप्प झाला आहे. जोगेश्वरी, अंधेरी आणि वांद्रे या मार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे, तर काही ठिकाणी वाहने पूर्णपणे थांबली आहेत. प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली आहे. “सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो, पण २ तासांपासून एकाच जागी अडकलो आहे,” अशी खंत अंधेरी येथील एका वाहनचालकाने व्यक्त केली.




मुंबई पोलिसांचं आवाहन


मुंबईकरांना अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा तसेच किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे, त्याचबरोबर सांभाळून गाडी चालवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन स्थितीत १००, ११२ आणि १०३ वर संपर्क करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत