Mumbai Traffic Alert : पावसामुळे वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा

  67

मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून, वाहतूक कोंडीने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे म्हणून तो बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.



लांबच लांब रांगा


मुंबईच्या वाहतुकीचा महत्वाचा कणा मानला जातो तो म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग, तो आज सकाळपासूनच ठप्प झाला आहे. जोगेश्वरी, अंधेरी आणि वांद्रे या मार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे, तर काही ठिकाणी वाहने पूर्णपणे थांबली आहेत. प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली आहे. “सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो, पण २ तासांपासून एकाच जागी अडकलो आहे,” अशी खंत अंधेरी येथील एका वाहनचालकाने व्यक्त केली.




मुंबई पोलिसांचं आवाहन


मुंबईकरांना अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा तसेच किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे, त्याचबरोबर सांभाळून गाडी चालवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन स्थितीत १००, ११२ आणि १०३ वर संपर्क करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

जुहू बीचवर २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारे १४ तास!

मुंबई : जुहूच्या सिल्वर बीचवर गोदरेज गेटजवळ समुद्रात वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी, विघ्नेश मुर्गेश देवेंद्रम

धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

मुंबई : दादरमधील गाजलेला कबुतरखाना अखेर हटवण्याच्या तयारीला सुरुवात झाली, पण ही कारवाई नक्की कधी होणार, याचं

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला