Mumbai Traffic Alert : पावसामुळे वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा

मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून, वाहतूक कोंडीने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे म्हणून तो बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.



लांबच लांब रांगा


मुंबईच्या वाहतुकीचा महत्वाचा कणा मानला जातो तो म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग, तो आज सकाळपासूनच ठप्प झाला आहे. जोगेश्वरी, अंधेरी आणि वांद्रे या मार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे, तर काही ठिकाणी वाहने पूर्णपणे थांबली आहेत. प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली आहे. “सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो, पण २ तासांपासून एकाच जागी अडकलो आहे,” अशी खंत अंधेरी येथील एका वाहनचालकाने व्यक्त केली.




मुंबई पोलिसांचं आवाहन


मुंबईकरांना अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा तसेच किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे, त्याचबरोबर सांभाळून गाडी चालवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन स्थितीत १००, ११२ आणि १०३ वर संपर्क करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक