मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम ...
भारत अधिक विश्वासू आणि सच्चा भागीदार
भारत आणि मालदीव या दोघांची मैत्री दक्षिण आशियामधील सर्वात महत्त्वाची रणनितीक भागीदारी मानली जाते. २ वर्षांपूर्वी दोन्ही देशातील संबंध काही कारणास्तव ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू जबाबदार होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलंय. काहीजण याला भारतासाठी धक्का म्हणत होते. काहीजण दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. पण या उलट झालं. पीएम मोदी यांनी कूटनिती आणि Soft Diplomacy च्या बळावर भारताच महत्त्व मालदीवच्या नव्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं. डॉ. मोइज्जु यांना सुद्धा समजलं की, चीनच्या तुलनेत भारत अधिक विश्वासू आणि संकट काळातील सच्चा भागीदार आहे.
#WATCH | PM Narendra Modi arrives in Male, Maldives, to a warm welcome by President Mohamed Muizzu
The country's Foreign Minister, Defence Minister, Finance Minister and Minister of Homeland Security were also present to receive the PM on his arrival. pic.twitter.com/4kkZ5uVE7t
— ANI (@ANI) July 25, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कितवा दौरा?
मोदी २०१८ साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर २०१९ साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ३रा मालदीव दौरा आहे. पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला चालले आहेत. मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा चीनसाठी एक संदेश असणार आहे. कारण भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा चीनचा प्रयत्न होता.