मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर! जुहू- अंधेरी जलमय, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठप्प झाली आहे. पहाटेपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अंधेरी, सायन, कुर्ला, दादर आणि वांद्रे भागात पाणी भरले असून, ज्यामुळे रेल्वे सेवा देखील उशिरा सुरू आहेत. त्याचप्रमाणे विमानसेवेतदेखील अडथळे निर्माण झाले आहेत.



जुहू-अंधेरी परिसर जलमय


मुंबई उपनगरात प्रसिद्ध जुहू परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, अंधेरी भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.



पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत


मुंबईत मुसळधार पाऊसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सामान्य वेळापत्रकाच्या तुलनेत १५  मिनिटे उशिरा धावत आहेत. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.



आज कुठे किती पाऊस?


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागान दिलाय. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



 
Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन