'या' कारणांसाठी घेता येणार वर्षातून महिनाभराची सुट्टी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेत मोठा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर्षभरातून ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तसेच तुम्हाला कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, तर आता तुमची चिंता मिटली आहे.  कारण आता केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली.



डॉ. जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?


केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे पूर्ण करू शकतात.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२  अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरवर्षी ३०  दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते.


कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्व रजा वृद्ध पालकांच्या काळजीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येतात. केंद्रीय सरकारी कर्मचारी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही समाविष्ट आहेत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेऊ शकतात.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या