थकीत पीक कर्जाच्या डोंगरामुळे जिल्हा बँका अडचणीत

कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांकडून टाळाटाळ


मुंबई : महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे. राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे.


विधानसभेच्या निवडणुकीत राज्यांमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले. त्यामुळे कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता सरकार करेल, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केले. सरकारकडून कर्जमाफीचे ठाम आश्वासन मिळाले नसल्याने थकबाकी असलेला शेतकरी व पर्यायाने राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत.


थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. थकीत कर्जामुळे अनेक जिल्हा बँकांचे वसुलीचे प्रमाण घटले असल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राज्याच्या सहकार खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून २०२५ अखेर अल्प, मध्यम मुदतीचे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कृषीकर्ज थकले आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता