थकीत पीक कर्जाच्या डोंगरामुळे जिल्हा बँका अडचणीत

कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांकडून टाळाटाळ


मुंबई : महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे. राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे.


विधानसभेच्या निवडणुकीत राज्यांमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले. त्यामुळे कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता सरकार करेल, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केले. सरकारकडून कर्जमाफीचे ठाम आश्वासन मिळाले नसल्याने थकबाकी असलेला शेतकरी व पर्यायाने राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत.


थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. थकीत कर्जामुळे अनेक जिल्हा बँकांचे वसुलीचे प्रमाण घटले असल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राज्याच्या सहकार खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून २०२५ अखेर अल्प, मध्यम मुदतीचे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कृषीकर्ज थकले आहे.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ