Sneha Wagh : केतकी चितळेनंतर स्नेहा वाघ: 'मराठी मालिका आता नाही, कारण माझी भाषा बदललीये!'

  147

मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघनेही त्यात भर घातली आहे. "मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही, कारण माझी भाषा थोडी बदलली आहे," असे वक्तव्य स्नेहाने एका मुलाखतीत केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.





मराठी टेलिव्हिजनमधून हिंदीत गेलेल्या अनेक कलाकारांपैकी स्नेहा वाघ हे एक नाव आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ३' मध्ये दिसलेल्या स्नेहाने 'अधुरी एक कहाणी', 'या गोजिरवाण्या घरात' यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदीतही भरपूर काम केले. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. "एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही," असे ती म्हणाली.



स्नेहाने यावेळी तिच्या भाषेतील बदलावर लक्ष वेधले. ती म्हणाली, "मी जेव्हा हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. 'तुझी भाषा मराठी नाही, हिंदी नाही, ही कोणती भाषा आहे?' असं विचारलं होतं." त्यावेळी दिग्दर्शकांनी तिला सांगितले की, "तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल. त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल, तर तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे."


स्नेहाने पुढे सांगितले की, "त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले, आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रजभाषा यायला लागली आहे."

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून