Sneha Wagh : केतकी चितळेनंतर स्नेहा वाघ: 'मराठी मालिका आता नाही, कारण माझी भाषा बदललीये!'

मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघनेही त्यात भर घातली आहे. "मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही, कारण माझी भाषा थोडी बदलली आहे," असे वक्तव्य स्नेहाने एका मुलाखतीत केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.





मराठी टेलिव्हिजनमधून हिंदीत गेलेल्या अनेक कलाकारांपैकी स्नेहा वाघ हे एक नाव आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ३' मध्ये दिसलेल्या स्नेहाने 'अधुरी एक कहाणी', 'या गोजिरवाण्या घरात' यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदीतही भरपूर काम केले. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. "एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही," असे ती म्हणाली.



स्नेहाने यावेळी तिच्या भाषेतील बदलावर लक्ष वेधले. ती म्हणाली, "मी जेव्हा हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. 'तुझी भाषा मराठी नाही, हिंदी नाही, ही कोणती भाषा आहे?' असं विचारलं होतं." त्यावेळी दिग्दर्शकांनी तिला सांगितले की, "तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल. त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल, तर तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे."


स्नेहाने पुढे सांगितले की, "त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले, आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रजभाषा यायला लागली आहे."

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात