Rishabh Pant : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ऋषभ पंत आऊट! फलंदाजीसाठी कोण उतरणार?

मुंबई : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा एक चेंडू पंतच्या बुटावर लागला, त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. त्यामुळे पंतला ताबडतोब मैदानाबाहेर काढण्यात आले. पंतच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्याला ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत आणि आता त्यांना मँचेस्टर कसोटी सामन्यात फक्त ९ फलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. ऋषभ पंतला (Rishabh Pant Injury) ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. आता पंतच्या जागी टीम इंडियाच्या १५ सदस्यांच्या संघात इशान किशनचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.



टीम इंडियाकडून फक्त १० जण करणार फलंदाजी


ऋषभ पंतच्या जागी दुसरा कोणताही फलंदाज फलंदाजी करू शकणार नाही. ध्रुव जुरेल निश्चितपणे पंतच्या जागी विकेटकीपिंग करु शकणार, मात्र त्याला फलंदाजीसाठी परवानगी नसणार.





६ आठवड्यांसाठी पंत बाहेर?


सामन्याच्या ६८ व्या षटकात ऋषभ पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतला ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारायचा होता, मात्र तो हा फुल टॉस बॉल पूर्णपणे चुकवल्याने चेंडू पंतच्या उजव्या बोटावर लागला. पंतने त्याचा बूट काढला तेव्हा त्याला दिसले की थोडा रक्तस्त्रावही होत आहे. काही वेळाने त्याच्या पायावर सूज देखील दिसू लागली. तो चालण्यास असमर्थ होता, त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलावत पंतला रुग्णालयात हलवण्यात आले होते.



चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडले?


इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यानंतर केएल राहुल ४६ धावांवर बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ५८ धावांवर बाद झाला. शुभमन गिलही अपयशी ठरला. बेन स्टोक्सने १२ धावांवर शुभमन गिलला बाद केले. संघात पुन्हा परतलेल्या साई सुदर्शनने ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला. रवींद्र जडेजा १९ आणि शार्दुल ठाकूर १९ धावांवर खेळत आहे.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए