गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

  39

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या, अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी


नवी दिल्ली : येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणेकरून चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचणे सहज सुलभ होईल. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालवतानाच रेल्वे सेवांमध्ये तातडीने आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांचे अतिरिक्त कोच वाढवा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.


यावेळी गणेशोत्सवात विशेष गाड्या सोडतानाच अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला तत्काळ सूचना देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संगितले.
गणेशोत्सवातील रेल्वेसेवेबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.


नारायण राणे यांनी भेट घेत चर्चा केली आणि निवेदनही सादर केले. कोकणातील गणेश चतुर्थी उत्सव म्हणजे मोठा सण. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून असणारे कोकणवासी या उत्सवात आपल्या गावच्या घरी परततात.


यावेळी उपलब्ध असणारी सर्व वाहतूक अपुरी पडते. २७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या गणेश चतुर्थी उत्सवात कोकणात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते व रेल्वे आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात.


भारतीय रेल्वेने ऐतिहासिकदृष्ट्या या उत्सवादरम्यान विशेष गाड्या चालवल्या आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३४२ विशेष गाड्या चालवल्या आहेत. हे अतिशय स्वागतार्ह पाऊल होते आणि कोकणात प्रवास करणाऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला. यावर्षी यापेक्षाही जास्त गाड्यांचे नियोजन व्हावे अशी मागणी यावेळी खा. नारायण राणे यांनी केली आहे.




अनेक मुद्द्यांकडे निवेदनातून वेधले लक्ष


रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. राणे यांनी अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि पुणेसारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवा.


या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करण्याची खात्री करा, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन करता येईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल.


प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग थांबे वाढवा. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि उत्सवाचा आनंदही वाढेल असे रेल्वेमंत्र्यांकडे त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी सर्व सेवा सकारात्मक पुरविण्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या