पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा, भविष्यात उत्तम नियोजन करा

मुंबई : पोस्ट ऑफिसमधील  ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण भारतीय पोस्ट सेवेवर आजही केंद्र सरकारचे १०० टक्के नियंत्रण आहे. इथे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून काही वर्षांनी चांगला परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये काही अशा योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नसते आणि परतावाही निश्चित मिळतो.


पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. योग्य योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम आपल्याला परतावा स्वरुपात मिळते . पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट योजना या आधारावर आहे. यात प्रत्येक महिन्याला थोडी थोडकी रक्कम जमा केल्यानंतर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यातील मोठ्या खर्चांकरिता , उदा; मुलांचं शिक्षण, लग्न आणि प्रॉपर्टी घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



पोस्ट ऑफिसची आरडी योजना नेमकी आहे तरी काय ?


आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही बचत योजना आहे. यात प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवू शकता. यात व्याजासह रक्कम हळूहळू वाढते. मुदत संपल्यानंतर यातून तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पोस्ट ऑफिस सरकारच्या अधिपत्यात येते. त्यामुळे यात जोखीम खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक सुरक्षित ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये जमा केले तर ६ लाख रुपये जमा होतील . व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवेळी ७ लाख १३ हजार ६५९ रुपये मिळतील. म्हणजेच तु्म्हाला १,१३,६५९ रुपये इतके व्याज मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक तीन महिन्याने व्याजदर चक्रवाढ होते.



किती आहे सध्याचा व्याजदर ?


जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत आरडी योजनेवर ६.७ टक्के व्याज आहे. कदाचित यात वाढ देखील होऊ शकते. कारण सरकार दर तीन महिन्यांनी या दराचा आढावा घेऊन अपडेट करते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता. दुसरीकडे, आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात १२ हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास ५० टक्के कर्ज मिळू शकते. त्यामुळे गरजेवेळी मदत होऊ शकते. पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक असतो.


अस्वीकरण : ही संकलित माहिती आहे. 'प्रहार' या माहितीची हमी देत नाही. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची