पुढच्या वर्षी भारत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर, ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार

मुंबई : बीसीसीआयने भारताच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिका १ जुलै २०२६ पासून सुरू होईल आणि एकदिवसीय मालिका १४ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता या निमित्ताने रोहित शर्मा आणि विराट


कोहलीला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. टी-२० मालिका १ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. मालिकेचा पहिला सामना डरहॅममध्ये खेळवण्यात येईल. दुसरा टी-२० २ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये, तिसरा ७ जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये, चौथा ९ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये आणि शेवटचा ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टनमध्ये खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल.


दुसरा एकदिवसीय सामना १६ जुलै रोजी कार्डिफमधील सोफिया गार्डन्स क्रिकेट मैदानावर आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना १९ जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.


भारतीय महिला संघही पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात संघ तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळेल. ही कसोटी लॉर्ड्सवर होणार आहे. भारतीय महिला संघाच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळल्या गेलेल्या ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. टी-२० मालिका ३-२ आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा