पुढच्या वर्षी भारत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर, ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार

मुंबई : बीसीसीआयने भारताच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिका १ जुलै २०२६ पासून सुरू होईल आणि एकदिवसीय मालिका १४ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता या निमित्ताने रोहित शर्मा आणि विराट


कोहलीला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. टी-२० मालिका १ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. मालिकेचा पहिला सामना डरहॅममध्ये खेळवण्यात येईल. दुसरा टी-२० २ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये, तिसरा ७ जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये, चौथा ९ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये आणि शेवटचा ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टनमध्ये खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल.


दुसरा एकदिवसीय सामना १६ जुलै रोजी कार्डिफमधील सोफिया गार्डन्स क्रिकेट मैदानावर आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना १९ जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.


भारतीय महिला संघही पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात संघ तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळेल. ही कसोटी लॉर्ड्सवर होणार आहे. भारतीय महिला संघाच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळल्या गेलेल्या ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. टी-२० मालिका ३-२ आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे