IND vs ENG: दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २ बाद २२५ धावा,१३३ धावांनी अद्याप पिछाडीवर

मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवस संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात २ बाद २२५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात केली. त्यांच्या डावाची सुरूवात धमाकेदार राहिली.


बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने जबरदस्त बॅटिंग करताना पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. डकेटने या दरम्यान ७ चौकारांच्या मदतीने ४६ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर क्राऊलीने ७३ बॉलवर आपले अर्धशतक पूर्ण केले. यात ९ चौकारांचा समावेश आहे.


तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला. भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंत अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पाच विकेट मिळवल्या. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ अशा आघाडीवर आहेत. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी हा सामना करो वा मरोचा आहे.



असा होता भारताचा पहिला डाव


टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला यशस्वी जायसवाल आणि केएल राहुलने शानदार सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यशस्वी ५८ आणि केएल राहुल ४६ धावा करून बाद झाले. त्यानंतर साई सुदर्शन आणि ऋषभ पंतनेही चांगली खेळी केली. सुदर्शनने या कसोटीत आपल्या करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकत ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पंत आता साधारण दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना