उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंत आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या राजपत्राद्वारे धनखड यांच्या राजीनाम्याची अधिसूचना दिली होती.


भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत, भारतीय निवडणूक आयोगाला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक "राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952" आणि "राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974" अंतर्गत घेतली जाते.


निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्राथमिक तयारी पूर्ण होताच निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत झालेल्या सर्व उपराष्ट्रपती निवडणुकीची पार्श्वभूमी माहिती संकलित आणि प्रसिद्ध केली जाते. उपराष्ट्रपती पदासाठी निष्पक्ष, मुक्त आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जात असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.


भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ते आरोग्याला प्राधान्य देऊन तात्काळ पद सोडत आहेत. भाजपने 16 जुलै 2022 रोजी धनखड यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले. तर 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने