Saraswat Bank: सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाकडून न्यू इंडिया बँकेशी एकत्रीकरणावर 'ग्रीन' सिग्नल!

मोहित सोमण:सारस्वत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेशी एकत्रीकरण (Amalgamation) करण्यास मंजुरी दिली आहे. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ज्यात त्यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक (NICB) व सारस्वत बँक (Sarswat Bank) यांना ३१ जुलैपर्यंत आपल्या ताळेबंद जमाखर्च मांडण्यासाठी तसेच बँलन्स शीट आरबीआयला सादर करण्यासाठी संचालक मंडळाला सांगितले. यापूर्वी नियामक बँकेने (RBI) ने न्यू इंडिया बँकेवर क थित १२२ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे न्यू इंडिया बँकेच्या ग्राहकांना बँकेवर निर्बंध पडल्यामुळे ग्राहकांना आपले खाते हाताळण्यास खूप मर्यादा होत्या. अखेर यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकत्रीकरणानंतर बँकेच्या विस्ताराबरोबर ग्राह कांना विनासायास व्यवहार करता येतील हे स्पष्ट झाले आहे.

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना बँकेचे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की,' सारस्वत बँकेने विलीनीकरणाच्या प्रस्तावासह मध्यवर्ती बँकेकडे संपर्क साधल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे आणि अंतिम मंजुरी दोन्ही बँकांच्या भाग धारकांवर अवलंबून असेल. विलीनीकरणानंतर, सारस्वत बँक न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वे ताब्यात घेईल आणि ठेवीदारांचे हित पूर्णपणे संरक्षित केले जाईल.'

साधारणतः उपलब्ध माहितीनुसार,ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत एकत्रिकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही बँका आपले कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. यापूर्वी न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना केवळ २५००० रूपये खात्यातून काढण्याची परवानगी मिळा ली होती. बिघडलेली आस्थापना, बिघडलेले व्यवस्थापन (Corporate Governance) या पार्श्वभूमीवर आरबीआयने न्यू इंडिया बँकेवर कठोर निर्णय घेतला होता. त्यामुळेच या एकत्रीकरणानंतर बँक ग्राहकांच्या चिंतेला तिलांजली मिळणार आहे.

सारस्वत बँक ही भारतातील सर्वात मोठी सहकारी बँक ओळखली जाते. सारस्वतने गेल्या काही वर्षांतच सातहून अधिक बँकेचे अधिग्रहण केले होते. सारस्वत बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ५१८.२५ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) नोंदवला होता. तर बँकेच्या स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) केवळ २.२५% राहिला होता. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने कंपनीने हा निकाल नोंदवला.
Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर