IND vs ENG: मँचेस्टरच्या मैदानात आजपासून चौथ्या कसोटीला सुरूवात

भारत विरुद्ध इंग्लंड : शुभमनसेनेला मालिकेत कायम राहण्याची संधी


मँचेस्टर :इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये २३ जुलैपासून खेळवण्यात येत आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. उभयसंघात ५ पैकी ३ सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंड या मालिकेत २-१ ने पुढे आहे. त्यामुळे शुभमनसेनेला मालिकेत कायम राहायचे असेल, तर चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर इंग्लंडकडे या सामन्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी असणार आहे.


मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पोषक आहे. सुरुवातीला इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र फलंदाजांना सेट झाल्यास मोठी खेळी करण्याची संधी आहे. फिरकी गोलंदाजांना सामन्यातील तिसऱ्या दिवसापासून मदत मिळू शकते. सामन्यातील पाचवा आणि शेवटचा दिवस गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे फलंदाजांची चांगलीच कसोटी लागू शकते. खेळपट्टी पाहता टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. कारण ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे ठरणार नाही. भारतानेआतापर्यंत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत.


चिंताजनक बाब म्हणजे भारताला या ९ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने या मैदानातील ९ पैकी ४ सामने गमावले आहेत, तर इंग्लंडने भारताचा या मैदानात ५ सामन्यांमध्ये पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानात गेल्या अनेक वर्षांचा इतिहास बदलत चौथ्या सामन्यात विजय मिळवणार का ? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.



संकटमोचक बुमराह आक्रमक नेतृत्व करणार ?


इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुहेरी दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आगामी मँचेस्टर कसोटीत खेळू शकणार नाही. २२ वर्षीय रेड्डीला सरावादरम्यान गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्याने आतापर्यंतच्या दौऱ्यातील तीनपैकी दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता, मात्र आता तो मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयने अद्याप या दुखापतीबाबत अधिकृतपणे तपशीलवार माहिती दिलेली नाही. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे जसप्रीत बुमराहची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. मालिकेच्या या टप्प्यावर बुमराहला विश्रांती देण्याचे नियोजित होते; परंतु आता संघाला त्याची नितांत गरज असून, तो चौथ्या कसोटीत आक्रमणाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.



सामन्यांवर पावसाचे सावट


दरम्यान, मँचेस्टर येथे बुधवारी पाऊस होण्याची २५ टक्के शक्यता आहे, तर गुरुवारी २४ जुलैलाही पावसाची शक्यता २५ टक्के इतकीच आहे. शुक्रवारी २५ जुलैला पाऊस होण्याची शक्यता २० टक्के आहे. शनिवारी २६ जुलैला पाऊस होण्याचा २५ टक्के अंदाज आहे, तर सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस होण्याची सर्वाधिक ५८ टक्के शक्यता इंग्लंडच्या हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.



चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर


इंग्लंडने जाहीर केलेल्या संघात सॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, लियाम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफा आर्चर या खेळाडूंचा समावेश आहे. चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब वशीर याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी लियाम डॉसनचा इंग्लंड संघात समावेश झाला आहे.



गिल महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज


कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत ३ सामन्यांमध्ये १०१ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. शुभमनची या मालिकेतील २६९ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या व्यतिरिक्त २ शतकं ठोकली आहेत. त्याने आणखी २५ धावा केल्यास त्याच्या एकूण ६३२ धावा होतील. शुभमन यासह इंग्लंडमध्ये आशियाई फलंदाज म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. याआधी पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने २००६ साली इंग्लंडमध्ये ६३१ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात

ICC Womens cricket world cup : दीप्ती-अमनजोतची दमदार अर्धशतके; श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान

गुवाहाटी: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) च्या पहिल्याच सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेसमोर २७०

आशिया कप ट्रॉफी वादावर बीसीसीआय आक्रमक! विजेत्या संघाला ट्रॉफी का दिली नाही? नक्वींना राजीव शुक्लांचा थेट सवाल

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक

ICC Womens Cricket World Cup 2025: आता वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025)