७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

  52

निकालात त्रुटी राहिल्याचा राज्य सरकारचा दावा


मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली.


राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीकरिता सादर केली. यावेळी आमची एसएलपी तयार आहे. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै) रोजी यावर तातडीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली. त्यावर कैदेत असलेल्या ८ आरोपींना कालच्या निकालानंतर कारागृहातून सोडून देण्यात आले. तेव्हा आता इतकी घाई का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. राज्य सरकारची विनंती मान्य करत या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.


या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यात ५ पैकी ४ आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी