७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

निकालात त्रुटी राहिल्याचा राज्य सरकारचा दावा


मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली.


राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीकरिता सादर केली. यावेळी आमची एसएलपी तयार आहे. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै) रोजी यावर तातडीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली. त्यावर कैदेत असलेल्या ८ आरोपींना कालच्या निकालानंतर कारागृहातून सोडून देण्यात आले. तेव्हा आता इतकी घाई का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. राज्य सरकारची विनंती मान्य करत या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.


या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यात ५ पैकी ४ आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न