श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा ?

मुंबई : श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. त्याचप्रमाणे केस न कापणे , मांसाहार टाळणे अशा अनेक प्रथा या महिन्यात पाळल्या जातात . या परंपरेमागे काही धार्मिक, आयुर्वेदिक कारणे आहेत.


भगवान शंकराची उपासना करण्यासाठी श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित मानला जातो. यावेळी अनेक भक्त सोमवारचं व्रत करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करतात. अध्यात्मिक साधनेत अडथळा ठरू नये म्हणून मांसाहार या काळात वर्ज्य केला जातो. या महिन्यात शुद्ध आणि सात्त्विक आहारावर भर दिला जातो.


या काळात मांसाहार टाळणे ही एक जुनी परंपरा आहे, जी धर्म, आरोग्य यावर आधारित आहे. शरीर शुद्ध, मन शांत आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या काळात शाकाहारी, सात्त्विक आहार घेणं हेच योग्य ठरतं. म्हणूनच अनेक लोक या काळात मांसाहार सोडून सात्विक आहार घेतात .


श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच वैज्ञानिक कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि तापमानातील चढ-उतारामुळे शरीराची पचनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत मांसाहारासारखा जड आहार घेतल्यास अपचन, गॅस, पित्त, अन्नविषबाधा यासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याच काळात रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी झालेली असते, त्यामुळे सर्दी, ताप, त्वचारोग यांचा धोका वाढतो. पावसात मांस, मासे आणि अंडी लवकर खराब होतात व त्यातून अपायकारक बॅक्टेरिया तयार होतात. यातून संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. शिवाय, मांसाहार हा तामसिक आहार मानला जातो, जो मानसिक स्थैर्यावर परिणाम करतो – चिडचिड, आळस, आणि मानसिक अस्वस्थता निर्माण करतो. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळणे आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे

Ek Nath Shinde : कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पोलीस वसाहत पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजक आमदार

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई, ५ कोटींचे सोने जप्त; ७ अटकेत

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८