करुण नायर विदर्भाऐवजी कर्नाटककडून खेळणार देशांतर्गत क्रिकेट

  40

बंगळुरु : भारतीय फलंदाज करुण नायर तीन हंगामांनंतर कर्नाटक संघात परतणार आहे. गेल्या दोन हंगामांपासून नायर विदर्भासोबत होता. विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तो पुन्हा त्याच्या मूळ राज्य संघासाठी खेळू शकेल.


विदर्भाला तिसरी रणजी ट्रॉफी जिंकण्यास करुण नायरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १६ डावांमध्ये ५३.९३ च्या सरासरीने चार शतकांसह ८६३ धावा केल्या होत्या. नायरच्या याच चमकदार कामगिरीमुळे त्याला आठ वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली होती. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयी शतक त्याने झळकावले होते.


विजय हजारे ट्रॉफीमध्ये नायरने विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने विदर्भाला उपविजेतेपदापर्यंत नेले होते.आठ डावांमध्ये १२४.०१ च्या स्ट्राईक रेटने ७७९ धावा केल्या होत्या.ज्यामध्ये सलग पाच शतकांचा समावेश आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने लिस्ट ए मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. आणि बाद न होता ५४२ धावा करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.


इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी राहिलेली नाही. बेकेनहॅम येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ संघाकडून द्विशतक झळकावूनही त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ०, २०, ३१, २६, ४० आणि १४ धावा केल्या आहेत.


Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर