करुण नायर विदर्भाऐवजी कर्नाटककडून खेळणार देशांतर्गत क्रिकेट

बंगळुरु : भारतीय फलंदाज करुण नायर तीन हंगामांनंतर कर्नाटक संघात परतणार आहे. गेल्या दोन हंगामांपासून नायर विदर्भासोबत होता. विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तो पुन्हा त्याच्या मूळ राज्य संघासाठी खेळू शकेल.


विदर्भाला तिसरी रणजी ट्रॉफी जिंकण्यास करुण नायरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १६ डावांमध्ये ५३.९३ च्या सरासरीने चार शतकांसह ८६३ धावा केल्या होत्या. नायरच्या याच चमकदार कामगिरीमुळे त्याला आठ वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली होती. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयी शतक त्याने झळकावले होते.


विजय हजारे ट्रॉफीमध्ये नायरने विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने विदर्भाला उपविजेतेपदापर्यंत नेले होते.आठ डावांमध्ये १२४.०१ च्या स्ट्राईक रेटने ७७९ धावा केल्या होत्या.ज्यामध्ये सलग पाच शतकांचा समावेश आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने लिस्ट ए मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. आणि बाद न होता ५४२ धावा करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.


इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी राहिलेली नाही. बेकेनहॅम येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ संघाकडून द्विशतक झळकावूनही त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ०, २०, ३१, २६, ४० आणि १४ धावा केल्या आहेत.


Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत