७९९ कोटींच्या निधीतून होणार जिल्हा वार्षिक योजनेची कामे

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन समितीची बैठक


पालघर : आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना या तिन्हीही वार्षिक योजनांची कामे करण्यासाठी ७९९ कोटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यासोबतच सर्व तालुक्यांना समान निधीचे वितरण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.


वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पार पाडली.


या बैठकीस आ. पाशा पटेल, खा. सुरेश म्हात्रे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. राजेंद्र गावीत, आ. दौलत दरोडा, आ. शांताराम मोरे, आ. विलास तरे, आ. विनोद निकोले, आ. हरिश्चंद्र भोये, आ. स्नेहा दुबे पंडित, आ. राजन नाईक, तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत सर्वप्रथम ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २५ च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली. सन २०२४- २५ अंतर्गत आदिवासी उपयोजनांतर्गत १ कोटी २१ लाख व सर्वसाधारण अंतर्गत २ कोटी २० लाखांचा निधी तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यार्पित झाला असून उर्वरित निधी संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष कामे करण्याकरिता अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सन २०२४- २५ अंतर्गत एकूण ६८८.६० कोटींचा निधी अर्थसंकल्पित झाला असून ६८५.०९ कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना मंजूर कामाच्या पुर्ततेसाठी अदा करण्यात आला आहे. त्यापैकी ४४४ कोटीची निधी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेला आहे.


तसेच जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन २०२५- २६ अंतर्गत अनुक्रमे ४१०.१३ कोटी, ३७५ कोटी, आणि १४ कोटी असा एकूण ७९९.४३ कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे. तालुक्यातील प्रमुख समस्या लक्षात घेता कामे प्राधान्याने करण्याकरिता पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक