७९९ कोटींच्या निधीतून होणार जिल्हा वार्षिक योजनेची कामे

  57

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन समितीची बैठक


पालघर : आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना या तिन्हीही वार्षिक योजनांची कामे करण्यासाठी ७९९ कोटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यासोबतच सर्व तालुक्यांना समान निधीचे वितरण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.


वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पार पाडली.


या बैठकीस आ. पाशा पटेल, खा. सुरेश म्हात्रे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. राजेंद्र गावीत, आ. दौलत दरोडा, आ. शांताराम मोरे, आ. विलास तरे, आ. विनोद निकोले, आ. हरिश्चंद्र भोये, आ. स्नेहा दुबे पंडित, आ. राजन नाईक, तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत सर्वप्रथम ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २५ च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली. सन २०२४- २५ अंतर्गत आदिवासी उपयोजनांतर्गत १ कोटी २१ लाख व सर्वसाधारण अंतर्गत २ कोटी २० लाखांचा निधी तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यार्पित झाला असून उर्वरित निधी संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष कामे करण्याकरिता अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सन २०२४- २५ अंतर्गत एकूण ६८८.६० कोटींचा निधी अर्थसंकल्पित झाला असून ६८५.०९ कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना मंजूर कामाच्या पुर्ततेसाठी अदा करण्यात आला आहे. त्यापैकी ४४४ कोटीची निधी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेला आहे.


तसेच जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन २०२५- २६ अंतर्गत अनुक्रमे ४१०.१३ कोटी, ३७५ कोटी, आणि १४ कोटी असा एकूण ७९९.४३ कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे. तालुक्यातील प्रमुख समस्या लक्षात घेता कामे प्राधान्याने करण्याकरिता पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,