राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटींची कृषीसमृद्ध योजना जाहीर


नाशिक : शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच हवामान अनुकूल, शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्य सरकारने नव्या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही 'कृषीसमृद्ध' भेट असल्याचे राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले. त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला.


महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरीता अर्थसहाय्य करण्यासाठी कृषी विभागामार्फत नव्यानेच योजना जाहिर करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यास, त्यानुसार सन २०२५-२६ पासून पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी रु. पाच हजार कोटी अशी एकूण रु. २५ हजार कोटींची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी योजनेमुळे माझ्या शेतकरी बांधव-भगिनींच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल, असा विश्वास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी महसूल विभागाचा पुढाकार

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांना 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' सुरू चारा आणि बांबू

Big Opportunity: फुटबॉल टर्फ उभारणीचा खर्च, तांत्रिक निकष आणि नियोजनाचा मास्टर प्लॅन

Current Situation : सध्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत फुटबॉल टर्फ (Football Turf) व्यवसायाची क्रेझ वेगाने वाढत आहे. फिटनेस

Trimbakeshwar : अखेर त्र्यंबकेश्वरवर वरुणराजाची कृपा ! पावसाची जोरदार हजेरी

Trimbakeshwar : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्र्यंबकेश्वरकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.

Return of the Monsoon: सुस्तावलेला पाऊस पुन्हा सक्रीय, महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली होती, ज्यामुळे पावसाची तूट

Bollywood News : Google वर नोरा फतेहीची जादू,आलिया-प्रियंका-दीपिकालाही टाकले मागे, बनली सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार

Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे

PM Kisan Yojana : २३ व्या हप्त्याचे वितरण; देशभरातील ९.४४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,८८० कोटी जमा

Hooghly (West Bengal): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २० जून २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथून 'प्रधानमंत्री किसान