मुंबईत सकाळपासून मुसळधार! उपनगरांमध्ये हाहाकार, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली!


सखल भागात पाणी साचले! अंधेरी सब वे पाण्याखाली


मुंबई : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


उपनगरांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, अंधेरी सब-वे (Andheri Subway) पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, लालबहादूर शास्त्री मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.


सध्या आकाशात काळे ढग दाटून आले असून, आज दिवसभर पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुढील आठवडाभर हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (Yellow Alert) देण्यात आला असून, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



दुसरीकडे हवामान विभागाकडून सध्या तरी कोणत्याही जिल्ह्याला 'ऑरेंज' (Orange) किंवा 'रेड अलर्ट' (Red Alert) देण्यात आलेला नाही. आयएमडीने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आज सकाळी ९.१८ वाजता समुद्रात काही मिनिटांसाठी उंच लाटांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, २२ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यानंतर २३ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडसह पुण्यालाही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम