मुंबईत सकाळपासून मुसळधार! उपनगरांमध्ये हाहाकार, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली!


सखल भागात पाणी साचले! अंधेरी सब वे पाण्याखाली


मुंबई : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


उपनगरांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, अंधेरी सब-वे (Andheri Subway) पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, लालबहादूर शास्त्री मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.


सध्या आकाशात काळे ढग दाटून आले असून, आज दिवसभर पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुढील आठवडाभर हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (Yellow Alert) देण्यात आला असून, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



दुसरीकडे हवामान विभागाकडून सध्या तरी कोणत्याही जिल्ह्याला 'ऑरेंज' (Orange) किंवा 'रेड अलर्ट' (Red Alert) देण्यात आलेला नाही. आयएमडीने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आज सकाळी ९.१८ वाजता समुद्रात काही मिनिटांसाठी उंच लाटांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, २२ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यानंतर २३ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडसह पुण्यालाही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

केंद्र सरकारची स्वच्छता मोहीम, रेशन यादीतून काढली २.२५ कोटी अपात्र नावं!

मुंबई : केंद्र सरकारद्वारे समाजातील गरीब कुटुंबांना योग्य अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेशन योजना लागू

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची शासनाकडे सव्वा तीन हजार कोटींची थकबाकी, महापालिकेच्या पाठपुराव्याला अपयश

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही