कर्नाटकातील भाजीविक्रेत्याला २९ लाखांची जीएसटी नोटीस

बंगळुरू : भाजी विक्री करणाऱ्या शंकर गौडा या स्थानिक विक्रेत्याला तब्बल ₹२९ लाखांची जीएसटीची नोटीस मिळाल्याने कर्नाटकमध्ये लहान व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकर गौडांनी गेल्या चार वर्षांत ₹१.६३ कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार केले असून, यावरून जीएसटी विभागाने ही नोटीस पाठवली आहे.


शंकर गौडा गेली चार वर्षे हावेरीतील नगरपालिका हायस्कूलजवळ भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. ते शेतकऱ्यांकडून थेट ताजी भाज्या खरेदी करून विक्री करतात. “भाज्यांवर जीएसटी नाही. मी दरवर्षी इन्कम टॅक्स फाईल करतो, पण इतका मोठा जीएसटी कसा भरू?”, असा सवाल शंकर गौडांनी उपस्थित केला आहे.



ताज्या व न प्रक्रिया न केलेल्या भाज्यांवर जीएसटी नाही


मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ताज्या आणि प्रक्रिया न केलेल्या भाज्यांवर जीएसटी लागू होत नाही. मात्र, डिजिटल व्यवहारांना एकूण व्यवसाय मानून काही वेळा अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने नोटीसी पाठवल्या जातात.



लहान व्यापाऱ्यांमध्ये भीती; यूपीआयऐवजी पुन्हा रोखीचा पर्याय


या घटनेनंतर बेंगळुरू, मंगळुरू, मैसूरसारख्या शहरांमध्ये लहान दुकानदार यूपीआय व्यवहारांऐवजी पुन्हा रोख व्यवहार करायला सुरुवात करत आहेत. अनेक दुकानांवर "फक्त रोख रक्कम" अशा पाट्या झळकू लागल्या आहेत. काही हॉटेल चालक, पीजी मालक, रिक्षा चालक सुद्धा यूपीआयचा वापर टाळत आहेत.


वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी वार्षिक रक्कम ४० लाख आणि सेवा पुरवणाऱ्यांसाठी २० लाखांवरील उलाढालीवर जीएसटी नोंदणी अनिवार्य आहे. अनेक लहान व्यापारी अनावधानाने ही मर्यादा पार करत आहेत आणि त्यांना नोटीसींचा सामना करावा लागत आहे.



मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, “छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी हे प्रकरण मी केंद्र सरकार आणि जीएसटी कौन्सिलकडे घेऊन जाईन.” त्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.


Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर