कर्नाटकातील भाजीविक्रेत्याला २९ लाखांची जीएसटी नोटीस

बंगळुरू : भाजी विक्री करणाऱ्या शंकर गौडा या स्थानिक विक्रेत्याला तब्बल ₹२९ लाखांची जीएसटीची नोटीस मिळाल्याने कर्नाटकमध्ये लहान व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकर गौडांनी गेल्या चार वर्षांत ₹१.६३ कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार केले असून, यावरून जीएसटी विभागाने ही नोटीस पाठवली आहे.


शंकर गौडा गेली चार वर्षे हावेरीतील नगरपालिका हायस्कूलजवळ भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. ते शेतकऱ्यांकडून थेट ताजी भाज्या खरेदी करून विक्री करतात. “भाज्यांवर जीएसटी नाही. मी दरवर्षी इन्कम टॅक्स फाईल करतो, पण इतका मोठा जीएसटी कसा भरू?”, असा सवाल शंकर गौडांनी उपस्थित केला आहे.



ताज्या व न प्रक्रिया न केलेल्या भाज्यांवर जीएसटी नाही


मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ताज्या आणि प्रक्रिया न केलेल्या भाज्यांवर जीएसटी लागू होत नाही. मात्र, डिजिटल व्यवहारांना एकूण व्यवसाय मानून काही वेळा अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने नोटीसी पाठवल्या जातात.



लहान व्यापाऱ्यांमध्ये भीती; यूपीआयऐवजी पुन्हा रोखीचा पर्याय


या घटनेनंतर बेंगळुरू, मंगळुरू, मैसूरसारख्या शहरांमध्ये लहान दुकानदार यूपीआय व्यवहारांऐवजी पुन्हा रोख व्यवहार करायला सुरुवात करत आहेत. अनेक दुकानांवर "फक्त रोख रक्कम" अशा पाट्या झळकू लागल्या आहेत. काही हॉटेल चालक, पीजी मालक, रिक्षा चालक सुद्धा यूपीआयचा वापर टाळत आहेत.


वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी वार्षिक रक्कम ४० लाख आणि सेवा पुरवणाऱ्यांसाठी २० लाखांवरील उलाढालीवर जीएसटी नोंदणी अनिवार्य आहे. अनेक लहान व्यापारी अनावधानाने ही मर्यादा पार करत आहेत आणि त्यांना नोटीसींचा सामना करावा लागत आहे.



मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, “छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी हे प्रकरण मी केंद्र सरकार आणि जीएसटी कौन्सिलकडे घेऊन जाईन.” त्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात