लक्षद्वीपमधील बेट केंद्र सरकार घेणार ताब्यात

लक्षद्वीपमधील बेट केंद्र सरकार घेणार ताब्यात


नवी दिल्ली : लक्षद्वीपमधील बित्रा बेट राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सामाजिक परिणाम मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे बेटावरील स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता आणि चिंता पसरली आहे.


बित्रा हे लक्षद्वीपच्या १० वस्ती बेटांपैकी एक असून, सध्या येथे १०५ कुटुंबे राहतात. या बेटावरील रहिवाशांची एकूण लोकसंख्या सुमारे ३५० इतकी आहे. बेटाचे क्षेत्रफळ अंदाजे ०.०९१ चौ. कि.मी. असून ४५ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा मोठा लॅगून आहे. हे लॅगून भाग मुख्यतः स्थानिक मच्छीमारांद्वारे मासेमारीसाठी वापरला जातो.


लक्षद्वीप महसूल विभागाने ११ जुलै रोजी अधिसूचना जारी करत ते संरक्षण उद्देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत सामाजिक परिणाम मूल्यांकनासाठी आदेश दिला आहे. बित्रा बेटाची पूर्ण मालमत्ता संरक्षण आणि धोरणात्मक यंत्रणांकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शिवम चंद्र यांनी स्पष्ट केले आहे. एसआयए दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि स्थानिक ग्रामसभा, रहिवासी यांचा यामध्ये सहभाग राहील. ही प्रक्रिया ‘भूमी संपादन, पुनर्वसन व स्थलांतर अधिनियम २०१३’ अंतर्गत करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.


सरकारने स्थानिक जनतेच्या जीवनशैलीचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया लक्षद्वीपचे खासदार हामदुल्ला सईद यांनी दिली आहे.


Comments
Add Comment

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना