Ahmedabad News: धक्कादायक! पती-पत्नी अन् तीन मुलांसह अख्ख्या कुटुंबाची विष प्राशन करून आत्महत्या; अहमदाबाद हादरले!

  43


अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील बागोदरा गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी राहत्या घरात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्व पाचही मृतदेह घरात सापडले आहेत.


हे कुटुंब मूळचे ढोलका येथील होते, परंतु सध्या बागोदरा गावात भाड्याच्या घरात राहत होते. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात हे कुटुंब आर्थिक अडचणीत होते असे दिसून येत आहे.



मृतांमध्ये ३४ वर्षीय विपुलभाई कानाभाई वाघेला, त्यांची पत्नी २६ वर्षीय सोनलबेन विपुलभाई वाघेला, ११ वर्षीय मुलगी सिमरन विपुलभाई वाघेला, ८ वर्षीय मुलगा मयूर विपुलभाई वाघेला आणि ५ वर्षीय धाकटी मुलगी विपुलभाई वाघेला यांचा समावेश आहे. विपुल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.


या घटनेची माहिती मिळताच बागोदरा पोलीस आणि १०८ आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदाबाद ग्रामीण एसपी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि धांधुका एएसपी (ASP) यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.


पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बागोदरा सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. कुटुंबाने हा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासात कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोनही दोन दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.


Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी