Ahmedabad News: धक्कादायक! पती-पत्नी अन् तीन मुलांसह अख्ख्या कुटुंबाची विष प्राशन करून आत्महत्या; अहमदाबाद हादरले!


अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील बागोदरा गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी राहत्या घरात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्व पाचही मृतदेह घरात सापडले आहेत.


हे कुटुंब मूळचे ढोलका येथील होते, परंतु सध्या बागोदरा गावात भाड्याच्या घरात राहत होते. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात हे कुटुंब आर्थिक अडचणीत होते असे दिसून येत आहे.



मृतांमध्ये ३४ वर्षीय विपुलभाई कानाभाई वाघेला, त्यांची पत्नी २६ वर्षीय सोनलबेन विपुलभाई वाघेला, ११ वर्षीय मुलगी सिमरन विपुलभाई वाघेला, ८ वर्षीय मुलगा मयूर विपुलभाई वाघेला आणि ५ वर्षीय धाकटी मुलगी विपुलभाई वाघेला यांचा समावेश आहे. विपुल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.


या घटनेची माहिती मिळताच बागोदरा पोलीस आणि १०८ आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदाबाद ग्रामीण एसपी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि धांधुका एएसपी (ASP) यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.


पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बागोदरा सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. कुटुंबाने हा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासात कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोनही दोन दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.


Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर