Ahmedabad News: धक्कादायक! पती-पत्नी अन् तीन मुलांसह अख्ख्या कुटुंबाची विष प्राशन करून आत्महत्या; अहमदाबाद हादरले!


अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील बागोदरा गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी राहत्या घरात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्व पाचही मृतदेह घरात सापडले आहेत.


हे कुटुंब मूळचे ढोलका येथील होते, परंतु सध्या बागोदरा गावात भाड्याच्या घरात राहत होते. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात हे कुटुंब आर्थिक अडचणीत होते असे दिसून येत आहे.



मृतांमध्ये ३४ वर्षीय विपुलभाई कानाभाई वाघेला, त्यांची पत्नी २६ वर्षीय सोनलबेन विपुलभाई वाघेला, ११ वर्षीय मुलगी सिमरन विपुलभाई वाघेला, ८ वर्षीय मुलगा मयूर विपुलभाई वाघेला आणि ५ वर्षीय धाकटी मुलगी विपुलभाई वाघेला यांचा समावेश आहे. विपुल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.


या घटनेची माहिती मिळताच बागोदरा पोलीस आणि १०८ आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदाबाद ग्रामीण एसपी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि धांधुका एएसपी (ASP) यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.


पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बागोदरा सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. कुटुंबाने हा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासात कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोनही दोन दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात